अनुपमा ही टीव्ही मालिका खूप लोकप्रिय तर आहेच परंतु वेळोवेळी या मालिकेत काम करणाऱ्या सुधांशू पांडे, गौरव खन्ना, मदालसा शर्मा, आदि अनेक कलाकारांनी मालिका सोडल्यामुळे चर्चेचा विषय देखील बनली आहे. या मालिकेची नायिका रुपाली गांगुलीसह वादविवाद निर्माण झाल्यामुळे या कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला होता असे म्हटले जाते.
परंतु आता या मालिकेचे निर्माता राजन शाही यांनी एका मुलाखतीमध्ये यावर भाष्य करत गमतीने सांगितले की, सध्या देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही होत आहे त्याला रुपालीच जबाबदार आहे.
पुढे गंभीर होत त्यांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टीसाठी रुपालीवर आरोप ठेवणे ही अगदी सोपी गोष्ट आहे. तिच्यावर आरोप ठेवला की त्या कलाकाराची मुलाखत १० ठिकाणी प्रसिद्ध होते. रुपालीला आपल्या लोकप्रियतेची किंमत चुकवावी लागत आहे.
स्मृती इराणीनंतर रुपाली गांगुली टीव्हीचा मोठा ब्रँड बनली आहे. म्हणून मालिका सोडणारा कलाकार तिचे नाव घेत पब्लिसिटी कमावतो. टाळी दोन्ही हाताने वाजत असते. डेली सोपमध्ये काम करत असताना कलाकारांमध्ये छोटे मोठे वाद निर्माण होणे साहजिक आहे. प
रंतु निर्माता म्हणून मी एक गोष्ट नक्की सांगेन की, रुपालीमुळे आमच्या निर्मिती टीमला कधीच त्रास झाला नाही.
हे पण वाचा: तुर्कीने दिली मोठी ऑफर, पण बॉलिवूड अभिनेत्री म्हणाली – नाही!